Posts

Showing posts from September, 2016

टि.व्हीं.चे बदलते पाच तंत्रज्ञान हाताळतात ‘लेहरचंद’

Image
टि.व्हीं.चे बदलते पाच तंत्रज्ञान हाताळतात ‘लेहरचंद’ जागा कमी करतांना राहिल्या एलसीडी, एलईडीमध्ये त्रुटी : उद्योगात फटका बसल्याने थाटला स्वत:चा व्यवसाय जळगाव - जगात बदलत्या काळानुसार दररोज नवनवीन शोध लागत आहे. टि.व्ही.च्या तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे पुर्वी अवाढव्य असलेले टि.व्ही. आज भिंतीवर टांगता येवू शकतात. शहरातील लेहरचंद पोलडिया यांनी इलेक्ट्रीकलचे उच्चशिक्षण घेतल्यानंतर स्वत:चा उद्योग उभारला, परंतु त्यात नुकसान झाल्याने गेल्या 35 वर्षापासून ते व्यवसायातून आजवर 5 विविध प्रकारच्या टि.व्ही.ची दुरूस्ती करीत आहेत. जगात दररोज नवनवीन शोध लागत असतात. साधारणत: 40 ते 50 वर्षापूर्वी अवाढव्य रूंदी असलेले टिव्ही आज केवळ काही सेंटीमीटरच्या रूंदीवर येवून ठेपले आहे. ‘त्या’काळात घेतले उच्चशिक्षण लेहरचंद मुरारजी पोलडिया यांनी 1980 मध्ये पुणे विद्यापिठातून एम.एस्सी इलेक्ट्रिकलचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर बूश आणि ओनिडा कंपनीत वरीष्ठ अभियंता म्हणून ते कार्यरत 5 वर्ष होते. * टि.व्ही. बाजारात आणण्यासाठी होत्या 150 चाचण्या* 1980 च्या दशकात आयसी, पिक्चर ट्युबचे तंत...

मराठी विद्यार्थ्यांची कमाल, मेक्सिकोत बाप्पाची धमाल!

Image
मराठी विद्यार्थ्यांची कमाल, मेक्सिकोत बाप्पाची धमाल! दहा दिवस साजरा करणार गणेशोत्सव : मेक्सिकन नागरिकांचाही सक्रीय सहभाग जळगाव - मेरा भारत महान, भारतीय संस्कृती महान. भारतीय सण, उत्सव संस्कृतीचे गुणगान गावे तितके कमीच. परदेशींना तर भारतीय संस्कृतीचे अफाट वेड. खान्देशातील प्रदिप नाहिदे आणि युवराज सातकर हेे विद्यार्थी  पी.एचडी.साठी मेक्सिकोतील गुआनजुआटो विद्यापिठात गेल्या दोन वर्षापासून शिकत आहे. गणेशोत्सवात ‘बाप्पा’ची आराधना करण्याची ईच्छा दोघांच्याही मनात.  मनी निर्धार करून दोघांनी गणेशाची स्थापना केलीच अन् आज मेक्सिकन नागरिकही उत्स्फूर्तपणे बाप्पाची आराधना करीत आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा करण्यात येत असतो. परंतु अनेक देशांमध्ये भारतीयांची कमतरता असल्याने हवा तसा गणेशोत्सव साजरा करण्यात येत नाही. परंतु मेक्सिकोतील गुआनजुआटो विद्यापिठात गेल्या दोन वर्षापासून पी.एचडी करीत असलेल्या जळगाव येथील प्रदिप नाहिदे आणि धुळ्यातील दहिवद येथील युवराज सातकर या दोघांनी गणेशोत्सवाला सुरूवात केली. मेक्सिकन नागरिकाने दिली मूर्ती मूळ जळगावातील असलेल...

१४ सप्टेंबरपासून आपल्यासेवेत "सुरेशदादा"

Image
१४ सप्टेंबरपासून आपल्यासेवेत "सुरेशदादा" आत्मशुद्धीच्या पर्युषण पर्वात.. हृदयापासून क्षमा करा आणि बळही द्या..      जैनधर्मियांच्या पवित्र पर्वधीराज पर्व पर्युषण पर्वाच्या समाप्तीला शहराच्या राजकारणात गेल्या 35 वर्षांपासून एकहाती सत्ता गाजविणारे सुरेशदादा जैन साडेचार वर्षानंतर समस्त जळगावकरांची क्षमा मागून पुन्हा समाज(राज)कारणात सक्रिय होणार असल्याचा सूचक संदेश त्यांनी दिला आहे.     घरकुल घोटाळ्याप्रकरणी गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना राजकीय हितशत्रू माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या जन्मदिनाचा योगायोग साधत जामीन मिळाला. तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न 'दादा' पुन्हा सक्रिय होणार का? जळगावकरांना लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.      एकेकाळी जळगावची ओळख 'सुरेशदादा' अशी होती. पहावे तिकडे फक्त 'दादा' हेच नाव सर्वांच्या मुखी आणि समोर होते. सुरेशदादा यांनी जळगावच्या राजकारणात सक्रिय असतांना 35 वर्ष शहरासाठी आपले योगदान दिले. विधानपरिषद निवडणुकीत जैन यांचे नाथाभाऊंसोबत चांगलेच बिनसले...

भाऊ-दादा आज करणार क्षमायाचना?

Image
भाऊ-दादा आज करणार क्षमायाचना? रूसवे-फुगवे सोडून शहराच्या विकासासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरज       जैनधर्मियांचा पवित्र चातुर्मास सप्ताहात पर्युषण पर्व महत्त्वाचे असते, त्यातल्या त्यात पर्युषण पर्वाच्या समाप्तीला असणार्‍या संवत्सरीच्या दिवशी क्षमायाचना करून आजवर आपला वाद असलेल्यांशी पुन्हा गट्टी साधतात. जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर हितशत्रू समजले जाणारे माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सुध्दा संवत्सरी पर्वाची संधी साधून जळगावच्या हितासाठी नवा पायंडा उभारण्याची गरज आहे.      सध्या जैनधर्मियांचा पवित्र चातुर्मास पर्व सुरू असून उद्या दि.6 रोजी पर्वाधिराज पर्व पर्युषण पर्वाची संवत्सरीने समाप्ती होणार आहे. भगवान महावीर सांगतात, ‘क्षमा विरस्य भुषणमं’ क्षमा मागणे विरांचे भूषण आहे. सोडा राग, बोला गोड क्षमायचनेच्या दिवशी आजवर आपण कळत-नकळत मन, वचन आणि कायाने कोणाचेही मन दुखावले असेल, स्वार्थ, अहंकारामुळे नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली असेल तर त्या व्यक्तीकडे क्षमायाचना करून ‘मिच्छामी दुक्कडमं...

*गीतकार ‘आधार’ला उभारीसाठी ‘आधार’ची अपेक्षा*

Image
*गीतकार ‘आधार’ला उभारीसाठी ‘आधार’ची अपेक्षा* गरीबीमुळे रिक्षा चालवून भागवतोय कलेची भूक : शिकण्याची उमेद पण.. जळगाव - कलाकारची भूक म्हणजेच त्याच्या कलेची साधना असते. सध्या बहुतांश कलाकार उपेक्षित असून तांबापुरा परिसरात राहणारा उगवता गायक आधारची व्यथाही काही वेगळी नाही. गायनाचे उच्चशिक्षण घेण्याची मनी उत्कंठ इच्छा असतांना केवळ गरीबीमुळे तो मागे राहत आहे. परिस्थिती माणसाला कुठल्या कुठे नेवून ठेवते. तांबापुरा परिसरात असलेल्या एका गरीब कुटूंबात जन्मलेल्या आधार संतोष ससाणे याच्या घरात 4 व्यक्ती. त्यात आई, भाऊ रोजंदारीने साफसफाईची कामे करतात तर वडील घरीच असतात. *एकलव्याप्रमाणे गायकी केली आत्मसात* जेमतेम आवक असलेल्या कुटूंबात आधारने 10वी पर्यंतचे शिक्षण मनपा शाळेत पुर्ण केले. गायनाची आवड असल्याने शिक्षण घेत असतांनाच कोणत्याही गायन मंडळांच्या कार्यक्रमात जाणे, गल्लीबोळात एखाद्या कार्यक्रमात संधी मिळेल तेव्हा गायन करणे, इतरांचे गायन मन लावून ऐकणे असे करत-करतच आधार थोड्याफार प्रमाणात गायन शिकला. *अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर* आधारचे गायन ऐकून त्याला काही कार्य...

'समाज सहकार्यातून 'समाज उभारणी'

Image
'समाज सहकार्यातून 'समाज उभारणी'     माझ्या सर्व समाज सदस्यांना नमस्कार. आज जगात वावरतांना प्रत्येक समाजाची एक ओळख आहे. कोणत्याची जातीचा 'शब्द जरी उच्चारला' तरी त्या जातीशी निगडीत 'सर्व चेहरे पटापट नजरेसमोर येतात', पण कधी 'वैश्यवाणी' असा उल्लेख केला तर आपल्या समाजाचे 50 चेहरे तरी लक्षात येतात का? नाहीच येणार. आपल्या वैश्यवाणी समाजाला आज आपणच ओळखत नाही तर जग कसे ओळखणार? हे असंच सुरु राहिले तर कधी एका काळी, देशात 'वैश्यवाणी' सुद्धा होते असे म्हणण्याची वेळ येईल.     'आपण समाजाचे देणं लागतो' हे आज केवळ एक वाक्य म्हणूनच राहिलंय. आपल्या वडीलधाऱ्यांना समाजातील प्रत्येक कुटुंबाची माहिती होती. समाजाच्या आयोजित प्रत्येक कार्यक्रमाला खेड्यापाड्यातून सर्व समाज एकत्र व्हायचा. परंतु आज 15-20 डोकं सोडले तर कुणीही पुढे येत नाही.     जळगाव येथील वैश्यवाणी नवयुवक मंडळाने माझ्या माहितीत असलेले एकमेव 'वैश्यवाणी नेते माजी उपमहापौर अनिलकाका वाणी' यांच्या सहकार्याने कांचननगर परिसरात समाज कार्यालयासाठी जागा मंजूर करून आणली. आपल्या स...