पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!
पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू! पोलिसांनी मनाशी निश्चित केले तर ते काहीही करू शकतात. गुन्हेगाराला शोधणे असो कि सर्वसामान्यांना न्याय देणे असो.. पोलीस सर्वच करू शकतात. नुकतेच जळगाव शहरात घडलेल्या दोन घटनांमध्ये याचा फार जवळून प्रत्यय आला पण त्यासाठी पोलिसांशी असलेले जवळचे संबंध देखील कारणीभूत ठरले. पोलिसात प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने जुगाड हवा हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. जळगाव शहरातून २५ दिवसापूर्वी एक महिला आपल्या दोन चिमुकल्यांसह बेपत्ता झाली. नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून नोंद केली. तपासी अंमलदाराने तपास सुरु केला मात्र तो काही वेळेपुरते मर्यादित ठरला. पाच दिवस उलटले तरी महिलेचा तपास लागत नव्हता. मोबाईल बंद, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही दिसत नव्हते. नातेवाईक हतबल झाले. एक दिवस अगोदरच घरात भांडण झाले होते. संतापात चुकीचे पाऊल तर उचलले नसेल अशी शंका मनात येत होती. नातेवाईकांनी अजमेर, सुरत, जालना, बऱ्हाणपूर, रावेर, जामनेर, जळगाव, चाळीसगाव, धुळे, नंदुरबार असे हजारो किलोमीटरचे अंतर शोधाशोध करीत पालथे घातले. सर्व बाजूने निरा...