Posts

राजकीय नेता नव्हे सच्चा मार्गदर्शक मित्र ‘अनिलभाऊ चौधरी’

Image
राजकीय नेता नव्हे सच्चा मार्गदर्शक मित्र ‘अनिलभाऊ चौधरी’ चेतन वाणी : भुसावळ नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस. अनिल म्हणजे ध्यानी, मनी, सर्वस्वी.. स्वार्थ, कपट, दुजाभाव ‘नील’ ठेवणारे अद्वितीय व्यक्तिमत्व. लहान असो की वृद्ध एकदा त्यांच्या संपर्कात आला की त्यांचा फॅन झाला. कुणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होतो त्यामागे कारणे देखील डझनभर आहेत त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कधीही कुणालाही अंतर देत नाही. आजच्या या मंगलदिनी आपले प्रिय नेता, समाजसेवेसाठी अर्पित असलेली एक प्रेरणादायी व्यक्ती, आपल्या जीवनाचा आणखी एक सुवर्ण क्षण साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेताना त्यांच्या कार्याची महती पुन्हा अधोरेखित करणे महत्त्वाचे ठरते. अनिल चौधरी नावातच एक जादू आहे. समाजात त्यांच्याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत मात्र जोपर्यंत आपण त्यांच्या सानिध्यात येत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा. अनिल चौधरी हे नाव मी जवळपास २० वर्षापासून ऐकतोय पण प्रत्यक्षात त्यांच्याशी जवळून ...

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

Image
पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग, आदरातिथ्याने सर्वच खूश  चेतन वाणी - देशभरात लाडक्या बाप्पाची स्थापना झाली असून सर्वत्र प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या देखील घरी गणरायाची स्थापना झाली आहे. पोलीस अधिक्षकांच्या अभय बंगल्यातील मुख्य हॉलमध्ये अतिशय आकर्षक सजावट करुन बाप्पा विराजमान आहेत. साहेबांच्या बंगल्याचा परिसर म्हणजे नयनरम्य ऐतिहासिक ठिकाण. सर्वत्र हिरवळ, दाट झाडी, झुडपातून जाणारा रस्ता, इंग्रजांच्या काळातील उत्कृष्ट संरचना असलेली दगडी आणि लाकडी इमारत. इथंच विराजमान आहे दिड फुटाची लहानशी बाप्पाची मूर्ती. पोलीस अधीक्षक दक्षिणेतील असल्याने इंग्रजी, मराठी, हिंदी आणि केरळी भाषेचे मिश्रण त्यांच्या बोलीत असते. जळगावच्या सर्वसामान्य जनतेत ते फारसे मिसळले नसल्याने बोली आणि स्वभाव अजून फारसा सैल नाही. पोलीस अधिक्षकांच्या बोलीमुळे बऱ्याचदा त्यांचा स्वभाव ओळखण्यात अनेकांची गफलत होते. तसा माणूस म्हणजे ते फार सरळ फक्त समजायला थोडा वेळ द्यावा लागतो. एकदा तुमची टोनिंग जमली की मग अगदी दिलखुलास गप्पा होऊ शकतात. सध्य...

गुणगौरव सोहळा : समाजाने, समाजासाठी राबवलेला युवकांचा पहिलाच उपक्रम

Image
गुणगौरव सोहळा : समाजाने, समाजासाठी राबवलेला युवकांचा पहिलाच उपक्रम        चेतन वाणी - वैश्यवाणी समाज तसे बघायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक. मुंबई, कोकण, गोवा परिसरात तसे समाजाची बरीच घरे आहेत मात्र त्यांचा इकडे संपर्क तोडकाच. खान्देश पट्ट्यात आमच्या समाजातील जुन्या मंडळींनी समाजाच्या एकत्रिकरण आणि प्रगतीसाठी बरेच प्रयत्न केले. वडिलधाऱ्यांची मेहनत म्हणूनच आज काही मंडळी चांगल्या पदावर आहेत.        मी लहान असताना आमच्या समाजात जळगाव जिल्ह्यात मोठा गुणगौरव सोहळा पार पडत होता. समाजाने अनेक वर्ष हा उपक्रम राबवला मात्र कालांतराने दुसरी पिढी समाजकार्यात पुढे सरसावली नाही आणि अनेक उपक्रम बंद झाले. सध्या तर समाज संघटन दूरच राहिले तरुणाई राजकारण, देश आणि धर्माच्या गोष्टी करतात, जेव्हा की अगोदर आपले संघटन मजबूत असेल तर धर्म आणि राष्ट्र मजबूत होईल हे त्यांना कळत नाही, किंबहुना ते त्यांना समजून घ्यायचे नाही.        विषयांतर नको.. समाजातील गुणवंतांचा गुणगौरव व्हायलाच हवा असा एक विचार यंदा पुन्हा पुढे आला. विचार आला खरा पण त्याला ...

पोलीसदलातील बाप माणूस ‘किसनराव नजन-पाटील’

Image
पोलीसदलातील बाप माणूस ‘किसनराव नजन-पाटील’ चेतन वाणी - पोलीस प्रशासन आणि माझं नाते तसे फार जुने नव्हे पण फक्त १४ वर्षांचे आहे. पोलीसदलात आजवर अनेक अधिकारी आले आणि गेले, संबंध सर्वांशी जोपासले मात्र मोजकेच जवळचे झाले. पोलीसदलात अधिकारी काही वर्षच संपर्कात येतात पण काही कायम घर करुन जातात. क्राईम रिपोर्टर म्हणून एलसीबी निरीक्षकाशी नेहमी संबंध येतो. जळगाव एलसीबीच्या बाबतीत बोलायचं झाले तर १४ वर्षापूर्वी भेटलेले निरीक्षक डी.डी.गवारे साहेब आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले किसनराव नजन-पाटील साहेब दोघं बाप माणूस. जळगाव जिल्ह्यात १४ वर्षापासून क्राईम रिपोर्टिंग करताना अनेक वरिष्ठ अधिकारी आले आणि गेले. विशेषतः आयपीएस अधिकारी २-३ वर्षासाठी येऊन कर्तव्य निभावून गेले. जवळपास प्रत्येकाशी आजही संबंध कायम आहेत. आयपीएस अधिकारी क्वचितच पुन्हा परिक्षेत्रात येतात मात्र निरीक्षक पुन्हा-पुन्हा प्रदक्षिणा घालून वळणावळणावर भेटतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असला तरी पोलीस-पत्रकार एकाच गाडीची दोन चाके असल्याने जुळवूनच घ्यावे लागते. तसे वाद घालणे स्वभाव नसल्याने ते आपसूकच जुळते. तिसऱ्या वर्गातील पहिले अधिकारी पोलीस ...

पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS)

Image
पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS) चेतन वाणी -  एखाद्या पत्रकाराने पोलिसाचे कौतुक करणे म्हणजे नवलच.. गावभरात पोलिसांविषयी ओरड होत असतांना आपण एखाद्या अधिकाऱ्याचे कौतूक करणे म्हणजे दुखावलेल्या आत्म्यांच्या आगीत तेल ओतण्यासारखेच काम आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत जळगाव जिल्हा तसा नशीबवानच ठरला आहे. जिल्ह्याला एक तपापासून लाभलेले जवळपास सर्वच अधिकारी एखादे व्यक्तिमत्व सोडले तर सर्वच चांगलेच होते. विशेषतः पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेच्या मनात निर्माण केलेली जागा एका मित्रापेक्षा कमी नाहीच.      जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचा एक तपाचा नामफलक पाहिला तर महाराष्ट्रीयन आणि दक्षिणेतील अधिकारी असा संमिश्र राहिला आहे. गेल्या बारा वर्षात जिल्ह्याने ७ पोलीस अधीक्षक पाहिले. कुणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी लकी ठरले तर कुणी पोलिसांनाच खाक्या दाखविला. कोरोना काळात लाभलेले पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे हे बहुतांश काळ जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. अनेक कार्...

गौसेवा : दारात, घरात नव्हे थेट किचन, बेडरूममध्ये गाय, कुत्रे..

Image
गौसेवा : दारात, घरात नव्हे थेट किचन, बेडरूममध्ये गाय, कुत्रे.. चेतन वाणी - जळगाव शहर, सुशिक्षित कुटुंबीय, भले मोठे मन आणि भले मोठे घर.. प्राणीमात्रांवर दया दाखविताना कर्णासारखे उदार मन ठेवणाऱ्या भुसारी कुटुंबियांनी गौसेवेचा एक उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे. २० गाय-वासरू, ५० कुत्र्यांना आपल्या अंगणात, घरात आणि थेट किचन, बेडरूममध्ये मुक्त संचार करू देणाऱ्या भुसारी कुटुंबाची एक आगळीवेगळी कहाणी, विचार ऐकल्यास आपल्याला देखील गौसेवेचा मोह आवरल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कलियुगात देखील असे कुणी असावे हे आश्चर्यच आहे. चला तर मग जाणून घेऊया.. भारतात आणि विशेषतः हिंदू धर्मीयांमध्ये गायीला गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे. समाजात फार पूर्वीपासून गाईचे महत्व अनमोल राहिले आहे. गाईपासून मिळणारे गोमुत्र, दूध, शेण सर्वच मनुष्य आणि निसर्गासाठी प्रचंड फायदेशीर आहे. कलियुगात गोहत्येचे प्रमाण वाढले आणि अनेक ठिकाणी कत्तलखाने सुरु झाले. भाजप सरकारच्या काळात गोरक्षणार्थ कायदा तयार झाला. कायद्याच्या अनुषंगाने गो हत्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी आजही ते शक्य झालेले नाही. काळानुरूप गौसेवेचे महत्व ...

‘शिवमहापुराण’ कथेचे महासेवेकरी ‘पोलीस’च..

Image
‘शिवमहापुराण’ कथेचे महासेवेकरी ‘पोलीस’च.. चेतन वाणी - जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची परीक्षा पाहणारा आजवरचा सर्वात मोठा सोहळा नुकतेच पार पडला तो म्हणजे वडनगरी शिवारातील पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सोहळा. कथेच्या निमित्ताने भक्तीचा जागर झाला, लाखो भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले, रात्रीची कडाक्याची थंडी, दिवसाचे ऊन सहन करीत भाविकांनी कथेचा लाभ घेतला. भाविकांच्या सेवेसाठी हजारो सेवेकऱ्यांनी सेवा बजावली मात्र खरे सेवेकरी होते ते पोलीस. तहान, भूक विसरून, पुरेशी झोप न घेता दिवसभर रस्त्यावर उभे राहून पोलिसांनी बजावलेल्या चोख कर्तव्यामुळे शिवमहापुराण कथा सोहळा कायदा व सुव्यवस्था राखत पार पडला. एरव्ही सण, उत्सव वेशीवर टांगून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या शिस्त, माणुसकीचे रूप जळगावात पाहायला मिळाले.  प्रख्यात कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी संपूर्ण देशातील भक्तांना ‘एक लोटा जल सारी समस्या का हल’ हा मंत्र देत भगवान भोले बाबाच्या भक्तीचा मार्ग दाखवला. देशभर सध्या पंडित प्रदीप मिश्रा आणि बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्याच नावाचा बोलबाला आहे. जळगाव तालुक्यातील...