Posts

Showing posts from February, 2017

*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*

Image
*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*           गेल्या अनेक वर्षांपासून कायम असलेली सेना-भाजप युती यावर्षी नाट्यमय घडामोडी होऊन तुटली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणाच केली. अवघे काही दिवस उलट नाही तोच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे वक्तव्य केले. केवळ आपलीच चर्चा मतदारांमध्ये रहावी या उद्देशाने भाजप-सेनेने भांडण केलं असल्याचे आता वाटतं आहे.      गेल्या चार महिन्यापासून राज्यात निवडणुकीची चर्चा सुरु आहे. चर्चा तर सर्व करताय पण कुणाची..? आठवण करून बघा जरा, कोणत्या पक्षाचं नाव येतं ओठांवर? भाजप आणि शिवसेना दोनच नाव लक्षात येतात. का तर, गावात ज्याची चर्चा, त्याचेच नाव ओठी असते. तशीच गंमत सध्या आपल्याकडे आहे. भाजप आणि सेना युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यातच त्यांचा दिवस जात होता. त्यामुळे कोणतीही वृत्तवाहिनी सुरु करा किंवा वृत्तपत्र वाचा दोनच नावे समोर भाजप आणि सेना. अगोदर युती कायम राहणार असे सुतोवाच करून ‘पहले तुम, पहले तुम’ करीत...

नवीन वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास...!

Image
नवीन वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास...!         मित्रांनो गेल्या साडेचार वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात वावरतांना अनेक दिग्गज संपादक, सहकारी, मित्र यांच्याकडून खूप काही शिकलो. गेल्या दोन वर्षापासून नवे वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास असे समीकरणच जुळले आहे. गेल्या नववर्षाला दै.गावकरी मध्ये रुजू झालो तर यावर्षी मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागात रुजू . बघूया हे वर्ष माझ्या सुप्त कलागुणांना आणखी काय- काय वाव देणार..!       जळगाव शहरात राहतांना यू बी ग्रुपमधून मर्चंटायझर, त्यानंतर छायाचित्रकार असे काम करतांना अनावधनाने पत्रकारिता क्षेत्रात आलो. सुरुवातीला दै.सकाळमध्ये शनिपेठ परिसरासाठी ‘सिटीझन रिपोर्टर’ म्हणून सुरुवात केली. सुरेश उज्जेनवाल सरांनी प्राथमिक पत्रकारिता समजाविली, परंतु मीच गंभीर नसल्याने फारशी मनावर घेतली नाही. खरी पत्रकारिता सुरु...     दैनिक देशोन्नतीमध्ये माझे मित्र योगेश चौधरी, निखील सोनार यांच्या मदतीने मला उपसंपादक म्हणून संधी मिळाली. पत्रकारितेमधील ‘प’ सुद्धा माहित नसलेल्या मला आवृत्ती प्रमुख मनोज बारी सरांनी खरा पत्रकार समज...

नाथाभाऊ : आपल्या माणसाची, आपुलकीची भेट!

Image
नाथाभाऊ : आपल्या माणसाची, आपुलकीची भेट!          मुंबईत आल्यापासून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. खान्देशातील अनेक माणसं भेटली, गप्पा झाल्या, ओळखी निघाल्या, परंतु आपुलकी नव्हती मिळाली. अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे नाथाभाऊ (एकनाथराव खडसे) यांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली अन मिळाली ना तीच आपल्या मातीची, आपल्या माणसाची आपुलकी..!             जळगावकर हक्काने सांगतात असे हक्काचे व्यक्तिमत्त्व नाथाभाऊ. एरव्ही मुंबईत असतांना मंत्री म्हणून भाऊ नेहमी व्यस्त होते. तरीही आपल्या परिवाराला, कार्यकर्त्यांना वेळ देणे, विचारपूस करणे हा त्यांचा पहिल्यापासूनच गुणधर्म. जळगाव आणि कोथळी येथे मुक्ताई बंगल्यावर ती जत्रा मी अनेकदा अनुभवली. नाथाभाऊ, कसे हळव्या मनाचे, मनमोकळे व्यक्तिमत्व हे मोजक्याच जवळच्या लोकांना माहिती. मुंबईत आल्यापासून मी जवळपास सर्व मंत्र्यांची कार्यालये हुडकून काढली. काही ना काही काम होतेच. मंत्री महोदयांना पाहण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष बोलणे मात्र कुणाशीही नाही झाले. जळ...