दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!
दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती! महाराष्ट्र शासनाने महिलांच्या विकासासाठी नेहमी प्रथम प्राधान्य दिले आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी २०११ पासून राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच पदभार स्विकारलेल्या अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी अवघ्या काही महिन्यातच अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या या अभियानाविषयी जागतिक महिला दिनानिम्मित आर.विमला यांच्याकडून जाणून घेवूया सविस्तर माहिती..! अभियानाचा मुख्य उद्देश आणि स्वरूप २०११ मध्ये केंद्र शासनाने जे वंचित आहेत अशा गोरगरीब जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा त्यासाठी या अभियानाची स्थापना केली. एकट्याने कोणतेही कार्य हाती घेतल्यास ते लवकर शक्य होत नाही, असा विचार करीत जास्तीत जास्त संस्था निर्माण करण्यावर शासनाने भर दिला. केंद्र शासनाने पंचसूत्री तर राज्यशासनाने दशसुत्री कार्यक्रमाची आखणी केली. त्यानुसार महिलांना एकत्र आणणे, त्यांची बैठक घेणे, बचतीची सवय...