महाविद्यालयीन युवतींसाठी 'टाईमपास ' कितपत योग्य ?
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना सुगीचे दीवस आले असून हि मराठी माणसांसाठी एक अभिमानाचीच बाब आहे . नुकत्याच काही दिवसांपूर्वी येउन गेलेल्या 'दुनियादारी ' आणि आताच आलेल्या 'टाईमपास ' चित्रपटाने तर अवघ्या तरुणाईला वेड लावले असून प्रत्येकाच्या मनात प्रेमाचेच वारे वाहत आहेत. परंतु 'टाईमपास ' चित्रपटात एक गरीब अशिक्षित मुलाला एक श्रीमंत घरातील सुशिक्षित मुलीवर प्रेम करतांना दाखविण्यात आले असून तो तिच्या वडिलांचा अहंकार जिरविण्यासाठी 'साईबाबा व आईबाबांची शपथ' घेऊन तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचे ठरवून तिला आपल्या जाळ्यात अड्कावितो . मित्रांच्या डिचविन्यामुळे सुरु केलेले 'टाईमपास ' प्रेम केव्हाच खरे होते हे त्याला स्वतालाही काळात नाही . संपूर्ण चित्रपटात नायिकेवर प्रेम करतांना नायक तिची खूप काळजी घेत तिला कोणतीही इजा करत नाही . परंतु चित्रपटाबाहेरील जगात सर्व उलटच घडत असून गरीब, अशिक्षित कुटुंबातील व टारगट मुलेही श्रीमंत सुशिक्षित मुलगी आपल्या जाळ्यात अडकविण्याचे स्वप्न (ध्येय ) ठरवूनच फिरत असून एखादी मुलगी आवडल्यास तिला...