गुणगौरव सोहळा : समाजाने, समाजासाठी राबवलेला युवकांचा पहिलाच उपक्रम
गुणगौरव सोहळा : समाजाने, समाजासाठी राबवलेला युवकांचा पहिलाच उपक्रम चेतन वाणी - वैश्यवाणी समाज तसे बघायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक. मुंबई, कोकण, गोवा परिसरात तसे समाजाची बरीच घरे आहेत मात्र त्यांचा इकडे संपर्क तोडकाच. खान्देश पट्ट्यात आमच्या समाजातील जुन्या मंडळींनी समाजाच्या एकत्रिकरण आणि प्रगतीसाठी बरेच प्रयत्न केले. वडिलधाऱ्यांची मेहनत म्हणूनच आज काही मंडळी चांगल्या पदावर आहेत. मी लहान असताना आमच्या समाजात जळगाव जिल्ह्यात मोठा गुणगौरव सोहळा पार पडत होता. समाजाने अनेक वर्ष हा उपक्रम राबवला मात्र कालांतराने दुसरी पिढी समाजकार्यात पुढे सरसावली नाही आणि अनेक उपक्रम बंद झाले. सध्या तर समाज संघटन दूरच राहिले तरुणाई राजकारण, देश आणि धर्माच्या गोष्टी करतात, जेव्हा की अगोदर आपले संघटन मजबूत असेल तर धर्म आणि राष्ट्र मजबूत होईल हे त्यांना कळत नाही, किंबहुना ते त्यांना समजून घ्यायचे नाही. विषयांतर नको.. समाजातील गुणवंतांचा गुणगौरव व्हायलाच हवा असा एक विचार यंदा पुन्हा पुढे आला. विचार आला खरा पण त्याला ...