गणेशोत्सव विसर्जन/ईद मिलाद : अनेक महिन्यांचे फलीत, शेवटचा तासभर मैत्रीचा सल्ला ठरला मोलाचा!
गणेशोत्सव विसर्जन/ईद मिलाद : अनेक महिन्यांचे फलीत, शेवटचा तासभर मैत्रीचा सल्ला ठरला मोलाचा चेतन वाणी : गणरायाचे आगमन म्हणजे सर्वत्र चैतन्य आणि सणासुदीची मांदियाळी आणणारा उत्सव. सामाजिक एकोपा जपणारा हा सोहळा गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आनंददायी असतो. गणेशोत्सवाच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी पोलीस दलाची असल्याने ते जास्त सतर्क असतात. जळगाव जिल्ह्यात यंदा सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडले आणि ईद मिलाद देखील उत्साहात साजरे झाले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी ठरले. मुख्य म्हणजे संपूर्ण पोलीस दलात सिंहाचा वाटा राहिला तो जळगाव 'एलसीबी'चा. जळगाव जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा शहरात कोणतेही गालबोट न लागता गणेशोत्सव आणि ईद मिलाद शांततेत पार पडल्याचे हे कदाचित पहिलेच वर्ष असावे. मुख्यत्वे ग्रामीण भागात नियमात आणि पोलिसांच्या सूचनेप्रमाणे सर्व विसर्जन आणि जुलूस मिरवण्यात आले. जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा, चिनावल, अडावद, धानोरा, नशिराबाद, भुसावळ, वरणगाव, एरंडोल, पाळधी, अमळनेर, पाचोरा ह...