Posts

Showing posts from April, 2023

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

Image
कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू' जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातील वातावरण गेल्या पंधरवड्यात पार ढवळून निघाले. मुख्यत्वे जातीय तणाव आणि दंगली उसळल्या, त्यातल्या तर गल्ली दादा जास्तच दबंगगिरी करू लागले. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पाहिले बोट उगारले जाते ते पोलिसांवर.. टीकेचा धनी पोलीसच होतो.. इतकंच काय तर सध्या दंगलीत पिळले जाणारे देखील पोलीसच.. अगोदर होता तसा खाकीचा दरारा राहिला नाही असे वाटू लागले असले तरी त्यामागे अनेक कारणे आहेत. मानव अधिकार आयोगाची नियमावली, संशयीत, गुन्हेगार, राजकारणी, अवैध धंदेवाल्यांचे वाढलेले प्रस्थ यामुळे सर्वच काही बदलले. सर्व काही असले तरी आजही गुन्हेगारांना वचक घालायला खाकी सक्षम आहे मात्र काही खाकीदार सक्षम नाही. विशेषतः नव्याने गेल्या १० वर्षात भरती झालेले अधिकारी आणि कर्मचारी. जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाची आणि सध्याच्या कायदा व सुव्यवस्था आणि गुन्ह्यांची परिस्थिती काही वेगळी नाही. सर्व काही सारखेच. स्थानिक प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी सक्षम ठरत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकार...